मुक्तवाहिनी शास्त्री: नदीपणाचे विद्यापीठ

“नदी”, “गंगा”, “सरिता”…या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे प्रवाह. वाहणे. वाहणे हा नदीचा धर्म, प्रवाह म्हणजे तिचा आत्मा. आज जेव्हा आपण आपल्या नद्यांची दैना बघतो, तेव्हा लागलीच कोणते शब्द आपल्या समोर येतात? प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, दुष्काळ, पूर…

नदी वाहती नसणे हे आपण खूप सहज मान्य केले आहे का?

मग याला आपण खूप कारणे दिली..अगदी आमच्याकडच्या नद्या कधीच बारमाही नव्हत्याच मुळी, त्या कोरड्याच होत्या हा तर्क आपण ओढून ओढून थेट पावसाळ्यात पण सांगायला मागे पुढे बघितले नाही. शासनदरबारी कोरडी नदी इतकी सोयीस्कररित्या “सरकारमान्य” होवून बसली की कृष्ण पाणी तंटा लवादात महाराष्ट्राने सांगितले कृष्णा आमच्याकडे बारमाही कधीच वाहत नाही. यावर लवादाने आपल्याला अभ्यासपूर्ण रित्या फटकारले हे सांगायला नको. Continue reading “मुक्तवाहिनी शास्त्री: नदीपणाचे विद्यापीठ”