ब्रह्मपुत्र नद का? बंगालच्या सागरात मिळणारे खूप नद आहेत तिथे. रूपनारायण, पगला, दामोदर, कुमार, गोदाधारी etc. तिथेच का? कारण कळल नाही.
पण एक आहे बघ. विनाशकारी पूर येतात या नद्यांना. ब्रह्मपुत्र तर वाट बदलण्यात माहीर. आज ही तर उद्या ती. तुम्ही भारी नदीच्या शेजारी गाव वसवाल, तर पुढच्या वर्षी गाव गायब. 1954 पासून त्याने ४००,००० हेक्टर जमीन खाल्लीये, २५०० गावे हाकलली आहेत..
याची geomorphology बाकी नद्यांपेक्षा वेगळी. गंगा मुखापाशी थोडी वाहवते, पण तशी युक्त वेणी. हा मात्र सारखे आपला जटा सोडतो, बांधतो.
प्रेमाने मोठीमोठी बेटे बनवणार. माजुली बघ. जगातले सगळ्यात मोठे नदीतले बेट. पण हा त्याला थपडा मारत राहणार.

त्याच्यावर पावित्र्याचे बंधन नाही. परशुराम कुंड सोडून त्याची इतर कुठे मारून-मुटकून पूजा होत नाही. गलिच्छ लोक त्याच्यात बुड्या मारत नाहीत. मुक्तपणे वागायला त्याला license आहे. बाकीचा मक्ता गंगेकडे.
त्याच्या मुक्त वागण्याला आणखी एक कारण आहे. हिमालयातून प्रचंड वेगात आणि तीव्र उतारांवरून तो धावत येतो, अरुणाचलच्या डोंगरांमधून येताना अफाट शक्ती असते त्याच्यात. आणि अचानक हे डोंगर संपतात आणि निझोमघाट, पासीघाट आणि परशुराम कुंड जवळचे सपाट भाग लागतात. अगदी अचानक.
हूश
अर्र्रे, पण करणार काय इतक्या उर्जेचे? सौम्य लग्न पचवत नाही त्याला. strugglerचे दिवस आठवतात. मग तो ती सगळी तांडव-शक्ती आणि गाळ घेऊन आडवातिडवा पसरतो. पूर्ण आसाम आपल्या पाण्याने आणि गाळाने व्यापून टाकतो. आणि इतके करून पण त्याचे भागत नाही. ते त्याला परत, परत, परत करायचे असते…दर वर्षी वेगळा मार्ग शोधायचा, नवी गावे बुडवायची.

U Turn मारण्यात हा पटाईत. भारतात येताना मोठा U घेतो पश्चिमेकडे..the Great Bend..तर भारतातून बांगलादेशात जाताना परत मोठा hairpin टर्न दक्षिणेकडे.
आणि तुला माहितीये, आपल्याला मारे वाटते आपल्याला समोरचा कळलाय वगैरे, पण ब्रह्मपुत्र भारतात येण्याआधी १६०० किमी धावलाय तिबेट मध्ये. He has a past. A heavy, heavy baggage.
त्याच्या अशा बेधुंद वागण्याला अजून कारणे आहेत..हिमालय, जिथे तो खूप वाहतो, तो दर शतकात १ मीटर वर येतोय. भूमी, जिच्या कुशीतून तो येतो ती देखील स्थिर नाही. १९५० आणि १८९७चे सगळ्यात मोठे भूकंप इथे झाले आहेत. आपले कसे ना, आपले बरे-वाईट बालपण मागे सोडता येते. मच्छिमार वस्ती आठवण म्हणूनच राहते, याचे तसे नाही. हा एकाच वेळी बाल, तरुण आणि म्हातारा. चिरतरुण तसाच चिरम्हातारा देखील.
थोडक्यात काय, इतके baggage आणि इतका प्रवास केलेल्या कोणाच्याच वाटते एकतर उभे राहायचे नाही… राहिलातच तर हे पूर्ण जाणून की ती व्यक्ती फक्त आपली नाही, इतकेच नाही तर पुढच्या लाटेत ती तुम्हाला देखील उद्वस्त करू शकते.
काहीही झालं तरी ब्रह्मपुत्राचा allegiance शेवटी बंगालच्या उपसागराशीच.
बाकी सब timepass Boss .
~परिणीता