Resilience आणि सहनशीलता निसर्गाकडून शिकावी…किंवा मांजरांकडून. मी आज अनोळखी गावाच्या sidewalk वर चालताना हरवले तर समोर एक सुकडी, झुपकेदार शेपटीची मांजर माझ्याकडे बघून हसली. हायला. ही ओळखीची!
खूप वर्षापूर्वी आपल्या घराच्या पार्किंग मध्ये यायची..मग गायब झाली.. ती आत्ता दिसली बघ. चेहऱ्यावर “दुनिया देखी है बॉस” अशी शांतता. परत आली.
ऑस्ट्रेलिया मध्ये दोन मोठ्या नद्या आहेत. मरे आणि डार्लिंग, त्यांचा delta एक आहे. सुंदर, lyrical नद्या. आपल्यासारखेच Australian लोकांनी पण त्यांचे सगळेच पाणी पिऊन टाकले. समुद्राला भेटे पर्यंत नद्या कोरड्या… पण या वर्षी बेभान पाउस झाला… मरे नदीने असे वाहते पाणी २३ वर्षात बघितले नव्हते… तिच्या तीरावरच्या थकलेल्या Eucalyptusआणि Red Gum बनांच्या खोल खोल अंधाऱ्या मुळापाशी आता थंडगार पाणी पोचले.
एखाद्या नीरव रात्री ऐकले तर झाडे पाणी पिताना ऐकू येतील. आपण जाऊ एकदा.
पाण्यामुळे Macro invertebrates वाढले… मग पक्षी, छोटे मासे, मग मोठे मासे…. सुरेल- बेसूर बुल frogs….खेकड्या सारखे yabbies.. एका भरपूर पावसाने नदीत जी productivity ची लाट उसळवली, ती थेट estuary पर्यंत…आता समुद्रापर्यंत पोचली! ‘सचैल गोपी न्हाल्या गं.’.

तशीच आपली कृष्णा..हिचे समुद्रा जवळचा प्रवाह वर्षे सरता सरता शून्यावर आले २००६ मध्ये. सगळी नदीची गाणी, कविता घाला चुलीत….पण या वर्षी पूर आलाच .
भारताने गंगेचे इतके पाणी रोखले, फराका बांधावरून इतके वळवले की सुंदरबन खारे होत गेले… तुला माहितीये, तिथले वाघ अतीव क्रूर आणि man eaters होण्या मागचे हे मोट्ठे कारण आहे…क्रौर्य आणि बांध. 🙂
पण कितीही तोंड पाडून बसा, रड घ्या, कोरड्या नदीवर कविता करा.. पाऊस येणारच. पुढे-मागे होईल, कमी जास्त होईल, अगदी २३ वर्षांनी येईल.. पण येणार.
पूर म्हणजे नदीचा उत्सव. पूर्वी बिहारमध्ये पौर्णिमेच्या आसपास पूर आला की लोक नावांमधून फिरायचे, चंद्राची, नदीची गाणी गायचे…. आता नदीला मारूनमुटकून शिस्त लावण्यासाठी बांधलेले embankment फुटले की कहर होतो फक्त.
आणि अंत बघितला की अघटीत पाउस येतोच..हवामान बदलतं..बांध फुटतात…रुस्क्या नद्या ओथंबून वाहतात. धरणांनी जास्त बांधले तर पूर रौद्र होत जातात… सिंधू नदीचे झाले तसे.
सजल वाटा समुद्राकडे वाहतात.
Journeys end in lovers meeting.
ते सोड, पण ही मांजर इतके समुद्र ओलाडून इथे कशी आली? लवकर बुक केले म्हणून चांगले डील मिळाले असेल तिला. 😉
or, like a wise friend says, journeys get new horizons when lovers meet. 🙂
~परिणीता